मेळघाटावर आता भीषण पाणीटंचाईचे संकट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

चिखलदरा : मेळघाटातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. यात काही गावांमध्ये प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कृत्रिम पाणी टंचाई तर काही गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजनाच करण्यात आली नसल्याने अनेक वर्षापासूनचे नैसर्गिक संकट कायम आहे.

मेळघाटातील अनेक गावांमध्ये गेली तीन ते चार दशके सतत पाणीटंचाई आहे. उन्हाळा आला की प्रशासन तात्पुरती व्यवस्था करते, मात्र ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या गावांची यादी करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना प्रशासनामार्फत होत नाही. प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी सामान्य माणसाकडून मागणी होत आहे. सध्या मेळघाटात धारणी व चिखलदरा तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. यासह काही गावांमध्ये पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बनलेल्या आहेत, पाईपलाईन सुद्धा झाली आहे, मात्र गावांमध्ये अजूनही पाणी पोहोचलेले नाही. प्रशासनाने ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा व मेळघाटातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी पाण्याची सोय करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.

कारंजखेडा छोटाढाणा येथे दोन हातपंप आहे. यापैकी एक दोन महिन्यापासून बंद आहे. एका कारंजखेडा छोटाढाणा येथे दोन हातपंप आहे. यापैकी एक दोन महिन्यापासून बंद आहे. एका हातपंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे, तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आला नाही. गावकऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बंद हातपंप दुरूस्त करून द्यावा, आदिवासी महिलांनी व बाधंवांनी केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013587
error: Content is protected !!