
अमरावती : यंदाचा खरिपाचा हंगाम – एक महिन्यावर आल्याने शेतकरी – मशागतीत व्यस्त आहे व यानंतर बी- – बियाणे, रासायनिक खते खरेदीची – धुमशान राहील. नेमके याच काळात – बोगस निविष्ठांचा शिरकाव होत – असतो. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात १ व जिल्हास्तर १ अशी १५ भरारी पथके कृषी विभागाद्वारा तयार करण्यात आधी अपोलोजणी होणार कांद्वारा कृषी केंद्रांची यंदाच्या खरीप हंगामात किमान ६.८२ लाख हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र राहण्याची शक्यता आहे. यामध्ये ५.६० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन व कपाशीचे पीक राहण्याची शक्यता आहे. कपाशीमध्ये शासनमान्यता नसलेले बियाणे विक्रीची शक्यता असते. गावागावांमध्ये एजंटांद्वारे बियाणे विक्री करण्यात येत असल्याचे प्रकार दरवर्षीच उघडकीस येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या नियमबाह्य बियाण्याची विक्री होऊ नये, यासाठी पथकांद्वारा वॉच ठेवण्यात येणार आहे.
खरीप हंगामासाठी ग्रामीणमधील १४ व जिल्हास्तरावर १ पथक याची खबरबात घेणार आहे.‘एडीओ’ जिल्हा पथकाचे प्रमुख जिल्हास्तरावर पथकाचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी व सचिव जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक आहेत. शिवाय या पथकामध्ये मोहीम अधिकारी व वजनामापे उपनियंत्रक सदस्य आहे. कृषी आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पथकांद्वारा कार्यवाही केली जाणार आहे.
प्रत्येक तालुक्यात एक पथक प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात १४ पथकांचे गठन करण्यात आलेले आहे. या पथकाचे प्रमुख संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आहेत, तर गुणनियंत्रण निरीक्षक पथकाचे सचिव आहेत. समितीमध्ये संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी व वजनमापे निरीक्षक हे पथकामध्ये सदस्य आहेत.
जिल्ह्यात निविष्ठा तक्रारीवर धडक कारवाईसाठी १५ पथकांचे गठन करण्यात आले आहे. या पथकांद्वारे बोगस निविष्ठांच्या विक्रीवर वॉच राहणार आहे.
– राहल सातपुते, जिल्हा अधीक्षक
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






