तेलंगणा, बिहार, गुजरात, ओडिशासह अनेक राज्यांमध्ये एरी रेशीम किड्याचा ट्रेंड, ईशान्य भारतातही लोकप्रिय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

केंद्रीय रेशीम मंडळाच्या शास्त्रज्ञांनी एरी रेशीम किड्याबद्दल आणि त्याच्या संगोपनामुळे तेलंगणामध्ये क्रांती कशी येऊ शकते हे दाखवून दिले. यासंदर्भातील तज्ज्ञांचा लेख.

 

एरी रेशीम, ज्याला अहिंसा रेशीम म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील सर्वात अद्वितीय आणि नैतिक रेशीम जातींपैकी एक आहे. तुती किंवा मुगा रेशीमच्या अगदी उलट, एरी रेशीम धागा काढण्यासाठी रेशीम किड्यांना मारण्याची आवश्यकता नाही. हा कीटक नैसर्गिकरित्या कोषातून बाहेर पडतो. यामुळे हे रेशीम उत्पादन क्रूरतामुक्त आणि पर्यावरणपूरक होते.

ईशान्य भारतात, विशेषतः आसाम आणि मेघालयात पारंपरिकपणे लोकप्रिय असणाही ही रेशीम उत्पादन कला आता गुजरात, बिहार आणि ओडिशासह देशाच्या इतर भागांमध्ये लक्ष वेधून घेत आहे. अहिंसेची नैतिकता, कमी भांडवल आणि स्थानिक कृषी-हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यामुळे हा एक व्यवहार्य पर्याय मिळत आहे. तेलंगणातील अलिकडेच केलेल्या एका केस स्टडीमध्ये असं दिसून आलय की, राज्यातील कोरड्या भागात एरीची लागवड केवळ व्यवहार्यच नाही तर आशादायक देखील आहे, विशेषतः सध्याच्या एरंड लागवडीशी ती पूरक होत आहे.

एरी रेशीम किड्याचे (सामिया रिसिनी) जीवनचक्र – एरी रेशीम किडा संपूर्ण रूपांतरातून जातो. त्याचा जीवनक्रम ४ प्रमुख टप्प्यांतून जातो. त्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अवस्था असते. मादी पतंग सुमारे ३५० अंडी (६५० प्रति ग्रॅम) रोगमुक्त अंडी (DFL) घालते. ही अंडी उबल्यानंतर अळ्यांमध्ये रुपांतरीत होता. या अळ्या २०-२५ दिवसांपर्यंत एरंडाची पानं खाऊन जगतात. परिपक्व झाल्यानंतर, अळ्या दोन ते तीन दिवसांत (तापमानानुसार) उघड्या टोकाच्या, धुरीच्या आकाराच्या कोशांमध्ये रुपांतरित होतात. इतर रेशीम जातींप्रमाणे, एरी रेशीमला धागा काढण्यासाठी रेशीम किडा मारण्याची आवश्यकता नसते. अंडी ते पतंग पर्यंतचे संपूर्ण चक्र सुमारे ३०-३५ दिवसांत पूर्ण होते आणि शेतकरी हवामान आणि यजमान वनस्पतींच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी ५ ते ६ बॅचेसमध्ये हे रेशिम किडे वाढवू शकतात.

भौगोलिक वितरण आणि सांस्कृतिक महत्त्व – Eri Silk ची सांस्कृतिक आणि व्यावसायिक मुळे भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये, प्रामुख्याने आसाम, मेघालय, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत. या रेशमी कापडाचा उपयोग बहुतेकदा पारंपरिक शाल, कपडे आणि नियमित वापरता येणाऱ्या पोशाखांसाठी केला जातो. अलीकडेच, मेघालयातील Eri Silk ला प्रतिष्ठित भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला आहे. यामुळे त्याचे प्रादेशिक वेगळेपण आणि सांस्कृतिक मूल्य स्पष्ट होते. या जीआय ओळख मिळाल्यानं केवळ या प्रदेशात अभिमानच नाही तर राष्ट्रीय स्तरावर या रेशीम जातीबद्दल रस वाढला आहे.

Eri ला ‘Poor man’s Silk’ का म्हटले जाते – Eri Silk ला त्याची परवडणारी किंमत, किमान भांडवलाची गरज आणि लक्षणीय आर्थिक फायद्यांमुळे मोठ्या प्रमाणात “Poor man’s Silk” म्हटले जाते. उदाहरणार्थ, एक ग्रॅम डीएफएलची किंमत सुमारे १८ रुपये असते आणि त्यात सुमारे ६५० अंडी असतात. जगण्याचा दर (अंदाजे) ६५% असल्याने, सुमारे ४२३ अळ्या परिपक्व होण्याची अपेक्षा आहे. एक ग्रॅम कवच तयार करण्यासाठी दोन कोशांची आवश्यकता असल्याने, जिवंत अळ्या प्रति ग्रॅम डीएफएल सुमारे २११ ग्रॅम कोश कवच देऊ शकतात.

प्रति किलो कोश ९०० रुपये या बाजारभावाने, एक ग्रॅम डीएफएलपासून मिळणारे उत्पन्न सुमारे १९० रुपये असेल. याचा अर्थ असा की १०० ग्रॅम डीएफएलसाठी १,८०० रुपयांच्या गुंतवणुकीतून, एक शेतकरी एकाच खेपेत सुमारे १७,००० रुपये कमावू शकतो (ही रक्कम स्थानानुसार बदलू शकते). यामध्ये श्रम आणि पानांशी संबंधित खर्च समाविष्ट नाही. अगदी किरकोळ काळजी घेऊन यावर काम केल्यास या रेशीम किड्यांच्या संगोपनातून मिळणारा असा नफा, लहान शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि सुलभ अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचं साधन आहे.

 

पौष्टिक अन्न म्हणून रेशीम किड्याचे कोष – एरी रेशीम उत्पादनाचे फायदे रेशीम उत्पादनाच्या पलीकडे आणखी काही मिळवून देतात. रेशीम किड्यांचे कोष प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा समृद्ध स्रोत असतात. आसाम आणि इतर अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये, हे कोष सामान्यतः उकडलेले, उन्हात वाळवलेले किंवा स्थानिक चटण्यांमध्ये मिसळून खाल्ले जातात. हे केवळ ग्रामीण कुटुंबांसाठी कमी किमतीचे पौष्टिक पूरक अन्न म्हणून काम करत नाहीत तर स्थानिक बाजारात विकले गेल्यास आर्थिकदृष्ट्या देखील फायदेशीर आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, देशाच्या इतर भागांमध्येही, जिथे कुपोषण आणि प्रथिनांची कमतरता आहे, तिथे कोष (प्युपा) खाण्याची पद्धत लोकप्रिय करण्याची गरज वाढत आहे. पौष्टिकतेने समृद्ध आणि शाश्वत अन्न पर्याय म्हणून प्युपाला प्रोत्साहन दिल्याने आहारातील विविधता वाढू शकते आणि प्रक्रिया करुन तसंच मार्केटिंग केल्यावर रेशीम शेतीवर अवलंबून असलेल्या समुदायांना अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी यातून निर्माण होऊ शकतात.

तेलंगणातील एक केस स्टडी – या उद्योगानं प्रेरित होऊन, गुगुलोथ जॉन आणि गीता या आदिवासी जोडप्याने त्यांचे नातेवाईक धारावथ साईचरण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या घरी एरी रेशीम किड्यांचे संगोपन सुरू केले. सध्या आसाममध्ये तैनात असलेले सेंट्रल सिल्क बोर्डमधील शास्त्रज्ञ-बी साईचरण यांनी ईशान्येकडील महिला-केंद्रित एरी संगोपन प्रणालींपासून प्रेरणा घेतली.

त्यांच्या उदाहरणाने प्रेरित होऊन, त्यांनी जॉन आणि गीता यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या एरंडाचा वापर करून त्यांची पहिली बॅच वाढवण्यास मदत केली. फक्त १० ग्रॅम बियाण्यापासून (CSB-ESSPC होसूर, तामिळनाडू येथून मिळवलेले), त्यांनी ५०० प्रौढ किडे वाढवले ​​आणि २५० ग्रॅम कोषाचे कवच मिळवले. या सुरुवातीच्या यशानंतर, ते आता पुढील एरंड हंगामानंतर शेतीची जमीन भाड्याने घेण्याची योजना आखत आहेत, जेणेकरून त्यांचे काम वाढेल आणि तेलंगणामध्ये एरी लागवडीचे एक शाश्वत मॉडेल तयार होईल.

तेलंगणामध्ये एरी उत्पादनाच्या संधी – तेलंगाणा राज्य पारंपरिकपणे एरी सिल्कशी संबंधित नसले तरी, ते नैसर्गिकरित्या त्याच्या लागवडीच्या क्षमतेने संपन्न आहे. पीजेटीएसएयूच्या कॅस्टर आउटलुक – मार्च २०२४ च्या अहवालानुसार, राज्यातील १,५८० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात एरंडाची लागवड केली जाते. विशेषतः महबूबनगर, नारायणपेट, नालगोंडा, जंगगाव आणि तेलंगणाच्या इतर भागांमध्ये ही लागवड होते. एरंड (रिकिनस कम्युनिस) ही एरी रेशीम किड्यांची प्राथमिक यजमान वनस्पती आहे आणि तेलंगणाच्या कोरड्या जमिनीत वाढते, ज्यामुळे एरी संगोपनासाठी एक आदर्श पर्याय बनते.

शिवाय, टॅपिओका-आधारित आणि एरी-आधारित एरी शेती दोन्ही शेतकऱ्यांना रेशीम उत्पादन आणि उप-उत्पादनांमधून उत्पन्नाचा दुहेरी फायदा देतात – जसे की टॅपिओका कंद आणि एरंडेल तेल. हे अन्न, सौंदर्यप्रसाधने आणि औद्योगिक उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमध्ये प्रक्रिया करुन वापरतात. यामुळे उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतात आणि विद्यमान पीक प्रणालींमध्ये मूल्यवर्धित नफा मिळवून देऊ शकतात.

यासाठी, सामंजस्य करार (एमओयू) आणि लक्ष्यित जागरूकता तसंच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे राज्य कृषी आणि बागायती विद्यापीठांशी धोरणात्मक एकात्मता महत्त्वपूर्ण ठरु शकते. अशा सहकार्यामुळे वैज्ञानिक मार्गदर्शन, तयारी तसंच सर्वांपर्यंत या नवीन उत्पादन साधनाची माहिती मिळू शकते.

मन की बातमध्ये राष्ट्रीय प्रोत्साहन – या जोडप्याचे प्रयत्न अशावेळी समोर आले आहेत जेव्हा एरी सिल्कमध्ये राष्ट्रीय रस पुनरुज्जीवित झाला आहे. २९ जून २०२५ रोजी, १२३ व्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयाच्या एरी सिल्कचे कौतुक केले आणि त्यांना अलीकडचे मिळालेल्या जीआय टॅगबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी एरी रेशीमचे क्रूरतामुक्त आणि शाश्वत स्वरूप, त्याचे हवामान परिवर्तनशीलता (हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड) आणि अहिंसात्मक नैतिकतेतून तयार झालेले कापड शोधणाऱ्या जागतिक बाजारपेठेतील त्याचे आकर्षण अधोरेखित केले. पंतप्रधानांनी एरी रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहायता गटांच्या (एसएचजी) भूमिकेचे कौतुक केले आणि आत्मनिर्भर भारत तसंच व्होकल फॉर लोकल अंतर्गत अशा स्वदेशी हस्तकलांना पाठिंबा देण्यासाठी सर्व नागरिकांना प्रोत्साहित केले.

शाश्वत भविष्यासाठी पाया – एरी रेशीम हे केवळ एक कापड नाही. ते ग्रामीण भारतासाठी आशेचा किरण आहे. कमीत कमी गुंतवणूक, मोठा नफा, नैतिक उत्पादन आणि कापणीनंतरचे पौष्टिक फायदे यासह, एरी रेशीम उत्पादन शाश्वत ग्रामीण विकासासाठी बहुआयामी उत्पादनाची संधी निर्माण करते.

तेलंगणामध्ये येणाऱ्या मुबलक एरंडे उत्पादनांसह आणि वाढत्या वैज्ञानिक संशोधनाचा वापर करुन, ईशान्ये बाहेरही एरी रेशीमचे केंद्र बनण्यासाठी योग्य आहे. अधिक जागरूकता, सरकारी पाठिंबा तसंच सामुदायिक सहभागातून, हे रेशीम पुन्हा एकदा ग्रामीण भारताच्या रचनेत उपजीविका, प्रतिष्ठा आणि आर्थिक लवचिकता विणू शकते.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013509
error: Content is protected !!