शिंगणापूर : स्थानिक अभिनव भारत विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. तनुश्री अशोक अडगोकर हिने ८९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला. अनुष्का सुनील चिमणकर हिने ८७.६० टक्के गुण घेत दुसरा, तर वेदिका भगतने ८५ टक्के गुण घेऊन तिसरा क्रमांक मिळवला. मुख्याध्यापक अतुल पाबळे, वर्गशिक्षक गौरव मोहोड, दीपाली उमक, लिपिक रवी भुयार, संदीप बनसोड यांनी समाधान मानले. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना बळ मिळाल्यास ते चमक दाखवितात, असे निकालाने स्पष्ट केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 77





