पोटातील आग पावसानं नाही विझणार; ४२ हजार हातांना ‘मनरेगा’चा आधार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

७६५ ग्रामपंचायतींमधील ६,९४० कामांवर ४१,७२३ मजुरांना काम

 

 

अमरावती : यंदा २१ जून उजाडला तरी पेरणीयोग्य पाऊस नाही, त्यामुळे पेरणी खोळंबली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेली ‘मनरेगा’ची ६,९४० कामे उपलब्धी ठरली आहे. सद्यःस्थितीत ४१,७२३ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. यामध्ये चिखलदरा व धारणी या तालुक्यात सर्वाधिक १२,९१६ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ‘मनरेगा’च्या कामांमुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे कामाच्या शोधात मजुरांची भटकंती व स्थलांतर टळले व गावाच्या परिसरातच त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मेळघाटातील आदिवासी कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. मात्र मग्रारोहयोच्या कामांमुळे हे चित्र पालटले आहे. या योजनेंतर्गत पहिल्या १०० दिवसांचा रोजगार हा केंद्र शासनाकडून उपलब्ध केला जातो तर उर्वरित दिवसांचा रोजगार हा राज्य शासनाकडून दिला जातो. शिवाय या वर्षी या कामांवरील मजुरीतदेखील वाढ झाल्याने मजुरांची संख्या वाढली आहे. आता पुन्हा वृक्षारोपणाची कामे सुरू होत असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत रोजगार उपलब्ध होणार आहे.

 

पावसाळ्यात सात हजार कामेतरुणांची संख्या कमी या योजनेद्वारे मजुरांना भर पावसाळ्यात सुरू असलेल्या ६,९४० कामांवर रोजगार उपलब्ध झालेला आहे. उन्हाळ्यात ९ हजारांवर कामे जिल्ह्यात सुरू होती, पावसाळ्यामुळे काही कामे बंद झाली.

या कामांवर सध्या तरुणांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. मनरेगापेक्षा जास्त रोजगार अन्य कामांतून मिळत असल्याने काही युवकांद्वारा अन्य कामांवर जोर दिला जात आहे.

 

योजनेतून कोणती कामे ?या योजनेतून रस्ता दुरुस्ती, खडीकरण, जलसंधारण, वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या विहिरी, रोप लागवड, वृक्षारोपण, फळबाग लागवड, घरकूल यासह अनेक कामे केली जातात.

पेरण्या खोळंबल्याचाही परिणाम जून महिन्यात पेरण्यांची लगबग असते व मजुरांना कामे उपलब्ध असतात. यंदा पावसाला विलंब लागत असल्याने ‘मनरेगा’च्या कामांवर भर पावसाळ्यात ४२ हजार मजुरांची उपलब्धी आहे.

 

तालुकानिहाय कामे व मजूर

तालुका     कामे   उपस्थित मजूर

अचलपूर : ८७८  –  २,४८२

अमरावती : ३८७ –  २,२१४

अंजनगाव : १६४ –  ६६९

भातकुली : २९६ –  १,२८६

चांदूर रेल्वे : ३७१ –  २,५३२

चांदूरबाजार : ५३९ –  २,६५०

चिखलदरा :  ७१२ –  ९,५३३

दर्यापूर : ५८१ –  २,०३९

धामणगाव : ३३९ –  १,८९६

धारणी : ६२४ –  ३,३८३

मोर्शी : ५८८ –  ४,९५२

नांदगाव : ५२३ –  २,५२६

तिवसा :  ५१३ –  २,५१७

वरुड :  ४२५ –  ३,०४४

एकूण : ६,९४०  –  ४१,७२३

 

७६५ ग्रामपंचायतीमध्ये कामे झाली सुरू ?

 

जिल्ह्यात सद्यःस्थितीत ८४६ पैकी ७६५ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक ८७८ कामे अचलपूर तालुक्यात तर ७१२ कामे चिखलदरा तालुक्यात सुरू आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013533
error: Content is protected !!